वरणगाव – गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वरणगाव येथे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी हर घर तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी व देशभक्तीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली विशेष महत्त्वाची ठरली. रॅलीत विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. ज्येष्ठ शिक्षक पी. एच. बोरसे, डी. एन. निंबोळकर, एम. आर. मोरे यांचे सहकार्य लाभले.
तसेच, विद्यालयात रक्षाबंधन हा पारंपरिक व बंधुत्वाचा संदेश देणारा उपक्रमही राबविण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक एम. आर. चौधरी, पर्यवेक्षक ए. एस. देशमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, ऐक्य आणि सामाजिक बंध मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एल. एम. ढाके यांनी केले. रक्षाबंधनाचे महत्त्व श्रीमती एस. डी. कापसे व श्रीमती एल. एन. भंगाळे यांनी स्पष्ट केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती सी. एस. चौधरी यांनी केले.
रॅलीचे महत्त्व:
तिरंगा सायकल रॅली ही केवळ एक कार्यक्रम नसून ती स्वातंत्र्य, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमान यांचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीद्वारे देशभक्तीची भावना प्रकट केली, पर्यावरणपूरक संदेश दिला आणि प्रत्येक घरात तिरंगा फडकविण्याचे महत्त्व जनमानसात पोहोचवले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव दृढ होते.
या प्रसंगी सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले .