प्रहार शेतकरी संघटनेची मागणी
भडगाव तालुक्यात पाऊस कमी झाल्याने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटना जनशक्ती पक्षाने केली आहे
तालुका उपाध्यक्ष हिम्मत सुदाम पाटील यांनी याबाबत तहसीलदार ,कृषी विभाग आदिंना पत्र दिले आहे
पत्रात म्हटले आहे की पर्जन्यमान कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे . पर्याची लागवड खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे शेतकरी आत्महत्या सारखे पाउल उचलू शकतो तरी शासनाने त्वरीत सर्वे करून तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी केली आहे .