Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


तरुणांनो महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घ्या ..पंकजपाल राठोड यांचे वरणगांव येथे प्रतिपादन




  वरणगांव  येथे खंजिरीवादक पंकजपाल राठोड यांचे समाजप्रबोधन  कीर्तनातून तरुणांना आवाहन चौफेर फटकेबाजी करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आहे . 
  महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर त्यांचे विचार डोक्यात घ्या असे आवाहन खंजिरी वादक पंकजपाल राठोड (वाशिम) यांनी येथील माळी समाज युवा संघटनेच्या वतीने आयोजित महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने समाज प्रबोधनात्मक कीर्तन रविवारी ९ रोजी गांधी चौकात आयोजीत केले होते. त्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात चौफेर फटकेबाजी करून उपस्थितांना शेवटपर्यंत लोटपोत करीत तरुणांना थोर महापुरुषाचे विचार डोक्यात घेण्याचे पंकजपाल राठोड यांनी आवाहन केले. 

सुरुवातीला संत सावता महाराज, छत्रपती  शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन माळी समाज अध्यक्ष संजय माळी, सहकारमित्र चंद्रकांत बढे सर, माळी समाज युवा संघटना अध्यक्ष बाळा माळी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी, शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समाधान चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवकचे योगेश पाटील, माळी समाज पंच गणेश माळी, शिरू माळी, विजय सोनवणे, शशी चौधरी, संदीप वाघ, श्रीकांत माळी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गांधी चौक भागात झालेल्या पंकज पाल महाराज यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाला महीला, पुरुष, तरुण, राजकीय सामाजिक शेत्रातील नागरिक मोठया संखेने उपस्तिथ होते. हा कार्यक्रम माळी समाज युवा संघटना आणि माळी समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा अध्यक्ष पंकज माळी (बाळा), उपाध्यक्ष अतुल माळी, सचिव किरणं माळी, महेश माळी, मयुर माळी, रितेश माळी, निखिल माळी, चेतन माळी यांचासह माळी समाजातील युवक तरुणांनी आणि जेष्ठ श्रेष्ठ समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.