वरणगाव भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्षांची बूथ स शक्ती करण ची बैठक तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यालयात संपन्न झाली . यावेळी मा नगराध्यक्ष सुनील काळे , उपनगराध्यक्ष शेख आखलाक , माजी सभापती श्री सुनील नेहते , भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जितेंद्र कोळी , माजी उपसभापती वंदना उन्हाळे , भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी , जिल्हा उपाध्यक्ष श्री मिलिंद भैसे , अड ए जी जंजाले , भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर , भाज्यूमो शहाराध्यक्ष आकाश निमकर , ओबीसी शहराध्यश गोलू राणे , शक्ती केंद्र प्रमुख रमेश पालवे , ग्रा पं सदस्य ज्ञानेश्वर भाऊ घाटोळे , जिल्हा चिटणीस अरुण बावणे ,साबीर कुरेशी, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी , तालुका सरचिटणीस मयूर शेळके , डॉ प्रवीण चांदणे ,अंकुश साबळे ,शालिग्राम डोयसे ,राहुल जंजाळे उपस्थित होते . ,यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील मनोगतात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना महणाले की राज्यात आपले सरकार आले असून एक रुपयात शेतकरी विमा काढून दिलासा दिला महिलांना एस टी प्रवासात 50 सवलत दिली यासह वरणगाव शहरातील 21 बूथ चां आढावा घेऊन 21बूथ अध्यक्षांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी बूथ जीतों और 202 4 को देश जितो' , 2024 ला पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी बूथ गठित करणे आवश्यक आहे .केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपा सेनेचे सरकार आहे . जनहिताचे निर्णय घेत असल्याने पुन्हा केंद्रात व राज्यात भाजपा चे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागावे असे आव्हान यावेळी तालकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले .