वरणगावसह परिसरात अपंग व्यक्तींना आनंदाचा शिधा तसेच रेशनचे धान्य योग्य पद्धतीने मिळाले नसल्याची तक्रार महीला दक्षता समितीच्या सदस्या व अपंग साधना संघांच्या सविता सखाराम माळी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव यांच्याकडे केली आहे .
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वरणगावातील प्रधान ,नन्नवरे , वंजारी ,चौधरी ,आदीच्या स्वस्त धान्य दुकानात मशीन 20 /20 किलो धान्य अपंगासाठी दाखवत असून केवळ पाच /पाच किलो धान्य पुरवठा विभागाकडून देण्यात आले असल्याचे दुकानदारांचे म्हणणे .आहे .तसेच अपंगांना शासनाकडून मिळणारा आनंदाचा शिधा सुद्धा देण्यात आला नाही .हा अन्याय अपंगावर का होत आहे . असा सवाल त्यांनी केला आहे . अपंगांच्या नावांची यादी ऑनलाईन शासनाकडे एक वर्षापूर्वीच सुपूर्द केली असून अद्याप पर्यंत त्यांच्यावर अन्याय होत आहे .तरी हा अन्याय पुरवठा अधिकाऱ्यांनी दूर करावा . व प्रत्येकी ३५ किलो धान्य मिळावे अशी मागणी आहे . मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सविता माळी यांनी दिलाआहे .