वरणगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या शारदा गंभीर माळी यांना महात्मा फुले ब्रिगेड तर्फे राज्य स्तरीय महात्मा फुले समाज रत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे .
हा पुरस्कार त्यांना सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व महात्मा फुले यांचे विचार जन सामान्यापर्यत पोचविण्याचे कार्य केल्या बद्दल देण्यात येणार आहे .
९ एप्रिल रोजी लातूर येथील भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्र आयोजक दत्तात्रेय चांबारगे (माळी ) व समिती तर्फे शारदा माळी यांना प्राप्त झाले आहे .
या यशाबद्दल वरणगांव परिसरात शारदा माळी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .