.
. भुसावळ तालुक्यात विल्हाळे येथे बुधवारी चार वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्यासह तुफान पावसासह तुळ रक गारपीट झाली . यात शेतकर्यांचे कांदा . पिकाचे नुकसान झाले आहे . झाडेही कोलमडून पडले आहेत तर नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने घर सामानाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि विल्हाळे येथील आमदार निधीतुन सिर्मेट चा मुख्य रस्ता बनवला होता . त्यांच्या बाजुला गटारी नसल्यामुळे लोकांच्या घरात पाणी गेले आहे . रस्ता उंच व घरे खाली गेल्याने रस्त्यावरील पाणी सरळ घरात गेले यात प्रतिभा कोलते यांच्या घरातील घर सामान व जिवनावश्यक वस्तुचे मोठे नुकसान झाले आहे . याबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा अधिकारी निधी संपला असे सांगतात रस्ता तयार करतांना गटारी तयार करणे आवश्यक होते . या कारणाने हे नुकसान झाले आहे अंदाजे दिड लाखाच्या वर घर सामानाचे नुकसान झाले आहे .
तसेच शिवारातील कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . संबधितांनी त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी लोक संघर्ष समितीचे आकाश कुरकुरे यांनी केली आहे .