Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विजय आपलाच होणार .राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे वरणगांव मेळाव्यात प्रतिपादन

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मेळावा वरणगाव येथील भाग्यलक्ष्मी लॉन येथे नुकताच पार पडला असून यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे , संतोष चौधरी ,रवींद्र भैया पाटील , राजेंद्र चौधरी , दिपक मराठे , सुधाकर जावळे , आदी उपस्थित होते .
 यावेळी जळगाव जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजय आमचाच होणार असे राष्ट्रवादीचे नेते नाथाभाऊंनी मेळाव्यात सांगितले आहे .
 यावेळी माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी सांगितले की ईश्वराच्या कृपेने मी न्यायालयात निर्दोष सुटलो असून आता एकनाथराव खडसे यांच्यासोबत काम करून सहकार खात्यात व इतर राजकीय ठिकाणी अधिकाधिक पक्ष कसा बळकट करण्यात येईल यासाठी आम्ही मेहनत घेवु . ज्यांना आम्ही शिकवले त्यांनी आम्हाला शिकवु नये . आम्ही दोघे एकत्र आल्याने भाजप नेत्यांना मळमळ होत असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले की शिंदे फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी शेतमजूर हवालदिल झाला आहे . वादळी पावसाने भयंकर नुकसान झाले आहे . परंतु मुख्यमंत्र्यांना अयोध्या व आसाम वारी करायला वेळ मिळत आहे . शेतकऱ्यांच्या साठी वेळ नाही या सरकारमधील आमदारांना शेतकऱ्यांशी काहीही घेणे देणे उरलेलं नाही , कृषी उत्पन्न बाजार समितीत अशा लोकांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन सुद्धा यावेळी नाथा भाऊंनी केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.